शनिवार, १० एप्रिल, २०१०

दिवेआगरच्या समुद्रावर रात्री गेल्यानंतर सुचलेली कविता !!!

सागरकिनारी जावे आपण एका चांदण्या राती
स्वागत अपुले व्हावे देऊन शुभ्र फुलांचे गुच्छ हाती

धवल सुमनांनी न्हाउन चिंब तू मग भिजावीस
बघतच राहावे तुजला कधी होऊ नये दीस

शशीप्रकाश जणू वितळे भासे मजला क्षितिजावरती
अशी झकास तू मिठी द्यावीस मजला तीरावरती

नांगर चांदीचा असलेले सापडावे एखादे गलबत
समुद्राची सैर तुला घडवीन मी ...अलबत

नाव तू घ्यावेस माझे डोलताना नावेत
हलकेच मग माझ्या यावेस तू कवेत

दोघांचेच असेल आपल्या भवतालीचे जग मग सारे
नटखटपणे पाहतील मीलन आकाशीचे झगमग तारे

1 टिप्पणी: